Thursday, July 15, 2010

अंत वेळी



कसं आहे रूप तुझं, कसा आहे रंग
कसा आहे भाव तुझा, कसा तुझा ढंग ।
कसा आहे सूर तुझा, कसा तुझा ताल,
कसा नाचवितो आम्हा,कशी तुझी चाल ।
कसं आहे मन तुझं, कसे हाव भाव
कुठे आहे घर तुझं, काय तुझा गाव ।
कसं आहे हसू तुझं कसे आंसू तुझे
साग ना जातात कसे रात दिन तुझे ।
होतो का रे कधी तरी आमचा आठव
उघडतोस का आठवणींचा साठव ।
भजतोय आम्ही तुला आळवितो अती
पण तुझ्या कानीं त्यातलं जातंय किती ।
ये रे ये रे आता नको पाहू ना रे अंत
अंत वेळी येशील ना, न राहो काही खंत ।