Thursday, July 15, 2010

अंत वेळी



कसं आहे रूप तुझं, कसा आहे रंग
कसा आहे भाव तुझा, कसा तुझा ढंग ।
कसा आहे सूर तुझा, कसा तुझा ताल,
कसा नाचवितो आम्हा,कशी तुझी चाल ।
कसं आहे मन तुझं, कसे हाव भाव
कुठे आहे घर तुझं, काय तुझा गाव ।
कसं आहे हसू तुझं कसे आंसू तुझे
साग ना जातात कसे रात दिन तुझे ।
होतो का रे कधी तरी आमचा आठव
उघडतोस का आठवणींचा साठव ।
भजतोय आम्ही तुला आळवितो अती
पण तुझ्या कानीं त्यातलं जातंय किती ।
ये रे ये रे आता नको पाहू ना रे अंत
अंत वेळी येशील ना, न राहो काही खंत ।

3 comments:

Aruna Kapoor said...

भजतोय आम्ही तुला आळवितो अती
पण तुझ्या कानीं त्यातलं जातंय किती ।
ये रे ये रे आता नको पाहू ना रे अंत
अंत वेळी येशील ना, न राहो काही खंत
...त्याची माया कळेना कशी!...खूपच छान शब्दांची गूंफण!

प्रशांत said...

डॉ. अरुणा कपूर यांच्याशी सहमत.
शेवटच्या ओळीतर छानच आहेत.

आता थोडसं तांत्रिक -
एकंदरीतच यमकांची मांडणी आणि कसं/कसे/कसा/कशी मुळे साधलेले अनुप्रासांमुळे कविता वाचताना एक मजा येते.

आणखी कविता येऊ द्या.

Suman said...

khupach sunder ahe......