Tuesday, January 29, 2008

किमया


चांदण्याचे पंख लागलेय आज मनाला
उमलले आहेत लाखो लाख गुलाब
श्रावणाच्या धारांत नाहून निघालय बेटं मन
लोळतंय हिरवळीवर खुशाल चाखत कोवळं ऊन
सारे सारे शब्द पडताहेत कानावर अमृत होऊन
सा-यांच्या नजरा करताहेत वर्षाव प्रेमाचा
कशाची ही किमया कशाची ही जादू
कुणाला विचारू कुणाला सांगू
पण गरजच नाहीय त्याची
जाणतेय मीच माझी
आज होणाराय ना आपली भेट
संध्याकाळ पासून रात्री पर्यंत थेट.

3 comments:

प्रशांत said...

सुरेख कविता..
नेहमीपेक्षा एकदम वेगळी आहे.

Tatyaa.. said...

नमस्कार आशाताई,

कविता खरंच छान आहे..

आवडली!

तात्या.

अवांतर - आपण http://www.misalpav.com/ येथेही यावे आणि लेखन करावे ही विनंती..

तात्या.

Sneha said...

khup sundar.... :)