नसावी इच्छा नसावी आकांक्षा
तृप्त असावं मन
नसावा द्वेष नसावी ईर्षा
शांत असावं मन

आल्या दिवसाचं करावं उत्साहानं स्वागत
उत्साही असावं मन
आनंदानं करावं पडेल ते काम
ओतावं त्यांत तन, मन, धन
वेगळी कांही ध्यान धारणा करण्याचं
उरणारच नाही मग कांही कारण
मन आनंदी असल्यावर
बाकी सारंच असेल अकारण
ब्रह्मानंदा चा अनुभव लाभेल क्षणो क्षणी
अनिर्वचनीय सुख लाभेल निर्वाणी