Sunday, April 27, 2008

सुख निर्वाणी


नसावी इच्छा नसावी आकांक्षा
तृप्त असावं मन
नसावा द्वेष नसावी ईर्षा
शांत असावं मन


आल्या दिवसाचं करावं उत्साहानं स्वागत
उत्साही असावं मन

आनंदानं करावं पडेल ते काम
ओतावं त्यांत तन, मन, धन

वेगळी कांही ध्यान धारणा करण्याचं
उरणारच नाही मग कांही कारण
मन आनंदी असल्यावर
बाकी सारंच असेल अकारण
ब्रह्मानंदा चा अनुभव लाभेल क्षणो क्षणी
अनिर्वचनीय सुख लाभेल निर्वाणी

3 comments:

प्रशांत said...

"पडेल ते काम
ओतावं त्यांत तन, मन, धन
वेगळी कांही ध्यान धारणा करण्याचं
उरणारच नाही मग कांही कारण"

जीवन कसं जगावं? याचं सार या ओळींमध्ये आकर्षकपणे मांडलंय. मस्तच आहे कविता.

अजित वडनेरकर said...

सुंदर। लगा जैसे बुद्ध की वाणी मराठी में पढ़ रहा हूं।

Tatyaa.. said...

kavitaa chhanach aahe...

Tatyaa.
http://www.misalpav.com/